डॉ।संजय राडकर यांचे दि. १९/१०/२०१० रोजी दू। ३.३० च्या दरम्यान पाम बिच रोड मुंबई येथून पत्नीसह प्रवासात अपघाती निधन झाले। हे अत्यंत दुर्दैवी वृत्त महाराष्ट्रातील तमाम महसूल अधिकार्यांसाठी तसेच सर्व मित्र परिवारासठी धक्कादायक आहे । डॉ।संजय राडकर हे १९८६ च्या तुकडिचे सर्वप्रथम आलेले उपजिल्हाधिकारी। त्यानी महसूल प्रशासनातील सर्व पदांवर काम केले, तसेच मंत्रालयात ते विशेष कार्य अधिकारी म्हणून कही काळ कार्यरत होते। त्यानी पंतप्रधान कार्यालयात विशेष कार्य अधिकारी म्हणून सेवा केली. ते अप्पर जिल्हाधिकारी म्हणून दीर्घ रजा घेउन ते रिलायंस सेझ प्रकल्पाचे मुंबई येथे काम पाहत होते। ते विलक्षण बुद्धिमान व् अत्यंत कार्यकुशल अधिकारी म्हणून सर्व परिचित होते। त्यांच्या अकाली निधनाने महसुली संवार्गाचे अपरिमित नुकसान झाले आहे । सर्व महसुली संवार्गाचे वतीने त्यांच्या पवित्र स्म्रुतिना प्रणाम व् चिरशांतिसाठी मनपूर्वक प्रार्थना।
पाम बीचवरील अपघातात 2 ठार; 5 जखमी - दै सकाळ वृत्त दि: २०/१०/2010
वाशी-पाम बीच मार्गावर भूमिराज बिल्डिंगसमोर मंगळवारी (ता. 19) झालेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात "रिलायन्स एसईझेड'चे अधिकारी संजय राडकर (वय 50) यांच्यासह दोन जण ठार; तर पाच जण जखमी झाले. या अपघातात राडकर यांचा कारचालक राजेंद्र कदम (28) याचाही मृत्यू झाला आहे. कदम हा सानपाडा येथे शिवसेना गटप्रमुखही होता. राडकर यांची पत्नी शुभांगी यांच्यासह अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. शुभांगी यांच्यावर नेरूळ येथील शुश्रुषा रुग्णालयात; तर कुशल अवस्थी (20) व सोनिया मास्किटा (18) या जखमींवर डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार चालू आहेत. हे दोघेही डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. राडकर यांची ऍसेट कार वाशीहून सीबीडीकडे येत होती. दुपारी 3 वाजता भूमिराज बिल्डिंगसमोर त्यांची गाडी आली असता, अचानक सीबीडीहून वाशीकडे जाणाऱ्या एंडिवेअर कारचालकाचे नियंत्रण सुटले आणि ती कार दुभाजक ओलांडून राडकर यांच्या कारवर आदळली. त्यांच्या कारच्या मागे असलेली आणखी एक सॅन्ट्रो कार राडकर यांच्या कारवर आदळली. त्यात कारचे टायर फुटल्याने हा अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
कोकण भवन येथे पूर्वी महसूल विभागात कार्यरत असलेले राडकर काही महिन्यांपासून सुटीवर होते. सध्या ते रिलायन्स एसईझेड प्रकल्पात वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत होते. तेथील सेवा संपल्यावर ते पुन्हा शासकीय सेवेत रुजू होणार होते. या दुर्घटनेमुळे शासकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस, पालिका व कोकण भवनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
सन्दर्भ: http://72.78.249.107/esakal/20101020/5308896064054017134.htm
A meeting place for dynamic and careerist Maharashtra State Civil Service Officers.
डॉ. अर्जुन चिखले यांचे नविन पुस्तक
जलगाँव- डॉ. अर्जुन चिखले यांचे नविन पुस्तक ' तलाठी मार्गदर्शक ' हे नुकतेच प्रकाशित झाले आहे. हे त्यांचे सहावे पुस्तक असून यापूर्वी त्यानी रोजगार हमी योजना, सामाजिक लेखा परिक्षण, आरक्षण, जातप्रमाणपत्र तपासणी इ. महत्वाचे विषयावर लेखन केले आहे. श्री चिखले हे अत्यंत अभ्यासू व व्यासंगी महसूल अधिकारी असून त्यांच्या या नव्या पुस्तकाचा तलाठी, मंडल अधिकारी व सर्वच वाचाकाना फायदा होईल.
श्री चिखले यांचे अभिनंदन व पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा ।
Subscribe to:
Posts (Atom)


